# Dhurandhar #Facts and Fiction धुरंधर ... अज्ञात वीरांची थरारक धैर्य गाथा फॅक्ट आणि फिक्शन राहुल लाळे हल्ली मोबाईल - इन्स्टा - फेसबुकवर रील्स बघताना - किंवा OTT वर सिनेमा किंवा एखादी सिरीज स्किप बटन वापरून फास्ट फॉरवर्ड करत पहाण्याची सवय झालेली असताना साडेतीन तासापेक्षा जास्त लांबीचा असलेला आदित्य धीरचा " धुरंधर" हा सिनेमा आठवडयात दुसऱ्यांदा पुन्हा काल बघितला यातच हा सिनेमा एवढा का चाललाय हे कळतं ! एव्हांना सर्वांना या सिनेमाची स्टोरी सर्वांना कळलीच असेलच त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यात आता हशील नाही. पण तरीही लिहिण्यासारखं बरंच आहे म्हणून हा प्रपंच !! " Elephant in the Room !" ही एक म्हण आम्ही कॉर्पोरेटमध्ये सारखी वापरतो - एखादा मोठा विषय असतो - पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. सत्य वेगळंच असतं , पण ते काहींना अडचणीचं वाटतं - त्यामुळे त्यावर स्पष्टपणे न बोलता त्याबद्दल सगळं गुडीगुडी -- छानछान बोललं जातं. तसाच एक प्रश्न - विषय म्हणजे "भारताचा इतिहास" आणि गेल्या शतकातील " भारत-पाकिस्तान " यांच्यातील संबंध !!! आणि त्यावर निघाले...
द बंगाल फाईल्स ... इतिहासातून वर्तमानात राहुल लाळे " पन्द्रह अगस्त का दिन कहता- आज़ादी अभी अधूरी है" ही अटलजींची कविता अनेकदा ऐकली आणि अग्रेषितही केली. त्यातली "कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी-पानी सहते हैं...उनसे पूछो, पन्द्रह अगस्त के बारे में क्या कहते हैं॥" ही ओळ कायम खटकायची. त्यामुळे कलकत्ता आणि १५ ऑगस्टचं काय नातं आहे हे शोधण्याचा बराच प्रयत्न केला तेंव्हा भारताच्या स्वातंत्र्याआधी तेंव्हाच्या बंगालमध्ये कलकत्ता आणि नौखालीमध्ये दंगली झाल्या होत्या एवढीच थोडीशी माहिती कळाली होती. पण परवा विवेक अग्निहोत्री-पल्लवी जोशी या जोडप्याचा " द बंगाल फाईल्स" हा चित्रपट पाहिला (विवेक-पल्लवीचे ताश्कन्द फाईल्स आणि काश्मीर फाईल्स नंतर हा चित्रपट पाहायची उत्सुकता होतीच) आणि त्यातून सादर झालेल्या अनेक प्रसंगातून त्यावेळी काय भयंकर घडलं असेल याच्या नुसत्या कल्पनेनं अंगावर शहारा आला. सिनेमाची अनेक परीक्षणं आली असतील - त्यामुळे परीक्षण नाही पण काही लिहावंसं वाटलं म्हणून हा प्रपंच ... हा सिनेमा आपल्याला सध्याच्या पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १९४...
नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. राहुल लाळे गिरनार - सोमनाथ - द्वारका * दिवस पहिला* १ - २ नोव्हेंबर एखाद्या गोष्टीची ओढ लागणं म्हणजे काय ते ती ज्याला लागते , त्यालाच कळते. शाळेत असताना मधल्या सुट्टीची - शाळा सुटल्यावर घरी जायची- अभ्यास संपल्यावर खेळायला जायची -परिक्षा संपल्यावर मे महिन्याच्या - दिवाळीच्या सुट्टीची ओढ असायची. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची ओढ प्रत्येकाला लागतेच. आईला दूर असलेल्या मुलांच्या भेटीची , प्रियकराला प्रियेची , मित्रांना स्नेहसंमेलनाची , गरीबांना न्याय , समता - विकासाची , समृद्धीची. आषाढ आली की वारकऱ्यांना वारीची.. भक्तांना आपापल्या श्रध्दास्थानांची... अशी ओढंच माणसाला जगायचा मार्ग दाखवते..नवी उर्जा देते. अशीच उर्जा मिळवण्यासाठी अनेक ठिकाणं पहाण्याची , अ नेक उपक्रमात सहभागी होण्याची मला आवड लागली असावी. त्यामुळे सुट्टी काढून बाहेर छोट्या मोठ्या पर्यटनाला जाणं नेहमीचंच. गेली काही वर्षं चैत्री पाडवा आला की उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा , आषाढ आला की वारी , गुरुपौर्णिमा आली किंवा ...
Comments
Post a Comment